चिखलदरा : मेळघाटातील अनेक गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. यात काही गावांमध्ये प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कृत्रिम पाणी टंचाई तर काही गावांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजनाच करण्यात आली नसल्याने अनेक वर्षापासूनचे नैसर्गिक संकट कायम आहे. मेळघाटातील अनेक गावांमध्ये गेली तीन ते चार दशके सतत पाणीटंचाई आहे. उन्हाळा आला की प्रशासन तात्पुरती व्यवस्था करते, मात्र ज्या गावात पाणीटंचाई आहे त्या गावांची यादी करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना प्रशासनामार्फत होत नाही. प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी सामान्य माणसाकडून मागणी होत आहे. सध्या मेळघाटात धारणी व चिखलदरा तालुक्यात अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. यासह काही गावांमध्ये पाण्याची कृत्रिम टंचाई आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बनलेल्या आहेत, पाईपलाईन सुद्धा झाली आहे, मात्र गावांमध्ये अजूनही पाणी पोहोचलेले नाही. प्रशासनाने ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, त्या ठिकाणी तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा व मेळघाटातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये कायमस्वरूपी पाण्याची सोय